Sunday 31 March 2024

योग मार्ग - ३ (yog marg)

गीतेत सांख्यालाही 'योगच' म्हटले आहे. भक्तीला सुद्धा 'योगच ' म्हटले आहे. कर्तव्यबुद्धीने संपादित कर्मालाही 'योगच' म्हटले आहे व आसन, प्राणायाम इत्यादींना सुद्धा 'योगच' म्हटले आहे.

साधकांची जशी प्रकृती, जशी रुची, जशी शक्ती, जशी अवस्था त्याप्रमाणे तो भापल्याला अनुकूल असा जो योगमार्ग त्याचा अवलंब करतो. योगयुक्त बुद्धीला धरून, एकान्तिक निष्ठेने साधना करीत रहातो व कृतार्थ बनतो

योगीराज गोरखनाथांनी योगसाधना प्रचलित करण्यासाठी आणि योगी-संप्रदाय प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्या काही शाखा बनविल्या. भिन्न भिन्न स्थानांवर आश्रमांची स्थापना केली, शिक्षणाची केंद्रे स्थापन केली आणि आपल्या शिष्यांच्या द्वारे, त्यांनी समग्र भारतात योगधर्माच्या प्रसाराची व्यवस्था केली.

उदारचरित असे ज्ञानी लोक आणि योगी लोक, कोणत्याही देवतेच्या उपासनेची अवज्ञा करीत नसतात. ते सर्व देवदेवतांना प्रकृती पुरुषेश्वर, कल्याणगुणाकार भगवानाची त्रिभूतीच मानतात. ते असेही समजतात की, सर्व देवदेवतांच्या उपासनेने एकाच भगवानाची उपासना होते. तरीपण ते असेही पाहतात की, प्रधानतः महादेवाची, शिव- शंभूचीच उपासना केली जात आहे. शिवशंभो हा योगी लोकांचा आदर्श आहे. आणि तोच ज्ञानी लोकांचाही आदर्श आहे. शिवशंभो हे भगवती महामायेचे स्वामी आहेत, जे विश्वब्रह्मांडाचे अधिपती आहेत. तरीपण ते निर्लिप्त रहातात. उदासीन रहातात. आत्मसमाहित रहातात. ते मायेच्या विकाररूप दुनियेला संयमानेच टाळतात. ज्ञानाग्नीच्या सहाय्याने भस्मीभूत करतात. तेच भस्म आपल्या अंगाला चोपडतात. आणि साऱ्या विश्वाला आपल्यात प्रलीन करतात. आणि आत्मानंदात तल्लीन होऊन रहातात.

योग मार्ग २ (yog marg)

साधना केल्यानंतर देह आणि इंद्रिये स्थिर होतात. प्राणस्पंदन स्थिर क नियमीत होते. चित्तवृत्तीचा निरोध होतो. आणि मग निर्मल निस्तरंग विषयसंग रहित, आत्मसमाहित अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाशी आत्म्याचे स्वरूप प्रकाशित होते. हाच मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय आहे.

ज्ञानी लोक असे सांगतात की, विषयाचे अनित्यत्वादी दोष पाहिल्यानंतर, मनात असा विचार निर्माण होतो की, ह्या दृश्य जगताशी आत्म्याचा काडीचासुद्धा संबंध नाही. तसा दृढ निश्वय सुद्धा होतो. चित्त स्वभावतःच विषयविमुख होने. अगदी प्रशांत होते, कर्मप्रवृत्ती नष्ट होतात, आणि इंद्रिये स्थिर बनतात. देह, इंद्रिये, मन यांत मूलतः बासना वास करते आणि वासनेचे मूळ अज्ञानात आहे. अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली की, सर्व प्रकारच्या चंचलतेची निवृत्ती होते. त्यासाठी योगिक प्रक्रियेचे विशेष प्रयोजन ठरत नाही.

आत्मविषयक श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्यामुळे आत्मस्वरूपाचे अपरोक्ष साक्षात्कार होतो. माया आणि मायेमुळे निर्माण झालेले सारे पदार्थ याविषयी वैराग्य उत्पन्न होते. आत्मध्वरूप प्राप्त झाल्यामुळे मायेपासून तो मुक्त होतो.

दोन्ही मार्गाचे मत असे आहे की, आत्मा स्वभावतःच शुद्ध आणि मुक्त स्वभावाचा आहे. प्रकृतीचे अथवा मायेचे गुण दोष आत्म्यावर आरोपिले जातात. आणि आत्म्याला बद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्म्याला यथार्थ स्वरूपाची उप- छब्धी करून दिली की, मुक्तीचा लाभ होतो. हीच मुक्ती, दोन्ही मार्गांचे लक्ष्य आहे. परंतु त्यांची साधनप्रणाली ही वेगवेगळी आहे. साधनप्रणाली वेगवेगळी असली तरी दोन्हींचे साध्य एकच आहे.

योग मार्ग - १ (yog marg)

अगदी प्राचीन कालापासून परमार्थनिष्ठ मुमुक्षूना, मोक्ष प्राप्तीसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा योगमार्ग. ज्ञानमार्ग हा तात्त्विक विचारांचे उत्तम साधन आहे. शास्त्राच्या सहाय्याने त्या मार्गाने स्थूल आणि सूक्ष्म, ऐहिक आणि पारमार्थिक विषयांचे अनित्यत्व, अशुचित्व, दुःखकरत्व आणि मोहजनकत्व वगैरे दोष आणि त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यत्व, असंगत्व, निष्क्रियत्व, सुखदुःखादीविहिनत्व, कार्यकारणातीत्व, सत्यज्ञानस्विरूपत्व वगैरे गुणांची पर्यालोचना करून, विषयसंपर्क - त्वजनपूर्वक चित्ताला आत्मस्वरूपात अथवा ब्रह्मस्वरूपात समाहित करणे ह। ज्ञानमार्गाचा मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय होय. योगीलोक सांगतात की केवळ विचारद्वारा वैराग्याची प्रतिष्ठाही होते, आणि परमतत्त्वात स्थितीपण प्राप्त होत नाही. जोपर्यंत प्राणाचे स्पंदन अनियमीतपणे चालू आहे- देह आणि इंद्रिये अस्थिर रहातात अंतःकरणात वृत्तीचे तरंग उठतात, अर्थात् जोपर्यंत इच्छाशक्तीचा प्रभाव प्राणावर, देहावर, इंद्रियांवर स्थैर्य संपन्न करीत नाही, चित्ताचा निरोध करू शकत नाही, तोपर्यंत वासनांचे निर्मूलन होण्याची शक्यता नाही. चित्ताची चंचलता दूर होणार नाही. अंतःकरण आत्मस्वरूपात समाहित होणार नाही. आणि त्यामुळे मोक्षप्राप्तीसुद्धा होण्याची सुतराम शक्यता नाही.

म्हणूनच यम-नियमांचे महाव्रत आचरायला हवे. अनुष्ठानाने देह आणि इंद्रियांचे दमन करायला हवे आणि आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...