Monday 20 April 2020

मी नंदेशनाथ - ३१

प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते हे खरे आहे कारण बऱ्याच लोकांना नेहमी वाटत असते मला भगवंताने दर्शन द्यायला हवे  सर्व देवी देवतां मला दिसायला हव्या. 

परंतु एक लक्षात असू द्या आपण मनुष्य आहोत  अंधाऱ्या खोलीत गेल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या काठीला आपण साप समजतो आणि नंतर समजते की ती काठी आहे तसच भगवंता सोबत नको व्हायला अचानक देव समोर आले आपली पात्रता नसताना तर किती घाबरून जाऊ आपण  साधे डोळे बंद करून बसलो तरी किती विचार येतात मनात आणि अचानक कोणी आल तर मृत्यू येऊ शकतो. 

भगवंताचे दर्शन घेण्याची क्रिया अगदी सोपी आहे स्वतः आराध्याच आपली ती पात्रता करून घेतो आपल्याला साधनेची सवय लावतो आपल्याला कडून अनेक साधना करून घेतो योग करून घेतो मन हे चंचल असते ते शांत एकस्थिर करून घेतो ऊर्जा काय आहे तिची जाणीव करून देतो कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व दाखवून देतो आणि मग समोर येऊन उभा राहतो. 

त्यामुळे घाई करू नका सत गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालत रहा नाथ तुमची वाट बघत आहे. 

Thursday 16 April 2020

मी नंदेशनाथ -३०

अनेकांचे फोन येतात काम सांगतात अडचणी सांगतात आणि लगेच उत्तराची वाट बघतात. २-३ तासांनी लगेच फोन करून विचारतात केलं का काम. 

काम केलं असेल तर ठीक नाहीतर बदनामी करायला तयार आरे मूर्खा नो ती काय खिरापत आहे का प्रत्येकाला वाटायला प्रत्येकाच्या नशिबात नसत उत्तर, किंवा नाथांनी कोण्या दुसऱ्या व्यक्तीची निवड केली असेल तुमचं काम करून द्यायला म्हणून आम्ही १० वेळेस विनंती करून पण आम्हाला सांगत नाही.

स्वतः बाप जन्मात एकदा सुद्धा नाम घ्यायचं नाही कधी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं नाही जे श्रद्धावान आहे त्यांची खिल्ली उडवायची स्वतः ला नास्तिक म्हणायचे आम्ही ते तसलं काही करत नाही असं जगाला सांगायचं आणि मुलाचं लग्न जमत नाही, संतती नाही, आजार खूप आहे असे 
संकट आली की भावनिक साद घा ला यची आणि उत्तराची अपेक्षा करायची. 

आणि मग उत्तर मिळालच तर तो जप किंवा साधना करायला कंटाळा करायचा. माझ्या कडे असे किती तरी उदाहणादाख ले आहे की नाथांचा आदेश येतो की अमुक अमुक व्यक्तीला जप,साधना सांग करायला, त्या व्यक्तीला सांगतील करायला की तो म्हणतो वेळ नाही जमत, लक्ष नाही लागत, नंतर सुरू केलं तर चालेल का, इतका जप कसा काय जमेल, इतका वेळ बसल नाही जात असे उत्तर नाथांना दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही कशी काय अपेक्षा करतात की नाथ तुमचे काम करतील.

एक लक्षात ठेवा जप करताना चुका करा, मांडणी करताना चुकीची करा, पूजा करताना चुकले तरी चालेल परंतु नाथांचे आदेश मात्र धुडकावून लावू नका नाहीतर ते तुम्हाला कुठल्या पाताळात टाकतील ते त्यांनाच माहीत. 

त्यांना संपूर्ण विश्व चालवायचे आहे तुमच्या कडे लक्ष आहे म्हणजे तुम्ही किती विशेष आहात हे लक्षात घ्या तुमच्या वर गुरुकृपा झाली आहे म्हणजे तुम्ही नरकात जरी गेले तरी सुखात असणार यात तिळमात्र शंका नाही, पण जर स्वर्ग सुख तुमच्या पायाशी लोळण घालतंय, रिद्धी सिद्धी तुमच्या दासी व्हायला तयार आहे, मोक्षाचा दरवाजा स्वतः सत गुरु उघडा ठेवून बसले आहे, फक्त तुम्हाला चालत तिथे जायचं आहे आणि नाथांना आलिंगन देऊन त्यांच्या त समाविष्ट व्हायचं आहे तर का हा अहंकार, का हा स्वार्थी पणा, कशासाठी हे माझं ते माझं करत बसायचं आहे आरे एकदा तरी त्यांना अनुभवून पहा किती कळजी घेतात ते आपली , किती मदत करतात ते प्रत्येक कार्यात आपल्याला आणि आपणच काम झालं की तुम्ही कोण आम्ही कोण अस वागतो. 

आदेश | 



Many of them call for their problems and ask to solve them immediately. They call back within 2 to 3 hours and check whether the problem is solved. 

If the work given is done then well and good , if not they start defamation. Silly people ! Is it something to plunder ! It is just a matter of luck , that is the reason there might be no answer for your problems. If not so, then Nath ji might have chosen someone else to solve your particular problem and that is why even after trying to find an answer, there is no response.

You never try to meditate in any way , never visit a temple, make fun of the people who have a belief on god, call yourselves as atheist , pass on comments like "we don't follow such rituals";
And ask to solve problems like son is not able to get married,  no offspring, there are lots of illnesses, and expect for the immediate results or answers.

If an answer to that particular problem is found then you feel lazy to do the given jap or Sadhana. I have many examples where Nath ji asks a particular person to do a jap, Sadhana and that person says that there is no time for it, I am not able to concentrate, Can I start it later? How can I do so much jap ? I cannot meditate for so long. If you give such answers then how can you expect that Nath ji will solve your problems in future.

Always remember, you might do a jap in a wrong way, you might perform a pooja in a wrong way but never disregard any Adesh given to you by Nath ji or else he might put you in an abyss which only he can decide. 

He has to run the whole universe. He has his attention on you, you much feel special about it, remember that. You have received Guru Krupa on you that means even if you travel in hell, you will live peacefully there , no doubt about it; but if the happiness in heaven is just near you, Riddhi ( spiritual power ) Siddhi ( prosperity) are ready to be your slaves,  Sadguru has opened the doors of moksha for you, the only thing you must do it walk the distance android embrace Nath ji to incorporate yourselves into him , then why this ego, why is this selfishness, why try to conquer everything.
For once in lifetime , try to experience Nath Ji's care and affection that he has for you, how much he helps you in all your deeds and you behave ungrateful to him once the problem is solved.


Adesh

मी नंदेशनाथ -२९

नाथांना काही नकोय काही म्हणजे काहीच फक्त तुमचा वेळ आज गेले 6 वर्ष मी अनाहत पर्यंत पोहोचलो आहे. मागे जाऊन विचार केला तर समजत की मीच स्वतः किती उशीर केला ह्या गोष्टीला माझ्या कडे वेळ होता बसायला जागा होती परंतु ध्यानाला बसायचा कंटाळा केला.

आज अनाह द मधील तो सुखद असा अनुभव घेतल्या नंतर या आनं दा पेक्षा जगात काही वेगळ असूच शकत नाही ही जाणीव झाली. आज घरात नाथांचा एक फोटो सुद्धा नाहीये मी कधी धूप, दीप, अगरबत्ती सुद्धा लावत नाही फक्त डोळे बंद करून बसतो आणि जप सुरू करतो.

कितीतरी येणारे फोन हे रंभा, भैरवी साधना मागतात त्यातून उत्पन्न काय होणार आहे हे नाथच जाणे. पण एक मात्र नक्की ह्या बाह्य साधना भौतिक सुख लगेच देतात परंतु मोक्ष प्राप्ती साठी आराध्याचा बीज मंत्रच कामी येतो. 

खरी परीक्षा ही आलेल्या पहिल्या अनुभवा पासून सुरु होते हे लक्षात ठेवा एक अनपेक्षित अनुभव आला की त्या नंतर किती तरी दिवस अनुभव शून्य जातात आस वाटत की आपण बरोबर करतोय ना? की काही चुकतंय परंतु नाथां च आपल्या वर प्रत्येक क्षणी लक्ष आहे आपण करत असलेली प्रत्येक कृती ते पाहत असतात आपण जेवढे त्यांच्या जवळ जाऊ तेवढे ते आपल्या जवळ येतात हा माझा अनुभव आहे. 

Monday 6 April 2020

हनुमान वडवानल स्तोत्र



भक्ती आणि शक्ती याच संयुक्त मिश्रण ज्या एका तत्वापाशी येऊन थांबते ते म्हणजे हनुमान तत्व. रामायणा पासून ते महाभारता पर्यंत तसेच चिरंजीवी पद प्राप्त झालेले हनुमान एकमेवाद्वितीय आहे. हनुमान यांना वीर बंकनाथ म्हणून सुद्धा ओळखले जाते.   हनुमान जयंतीला काय करावे हा अनेकांना प्रश्न पडतो अनेकांच्या देव्हाऱ्यात हनुमान यांची मूर्ती आहे त्यांनी विधीपूर्वक अभिषेक करून षोडशोपचार पद्धतीने पूजा अथवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी.

ज्यांच्या कडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी ठेऊन पूजा केली तरी चालेल. ज्यांना पूजा करणे शक्य नाही त्यांनी धूप लाऊन हनुमान चालीसा - ३ वेळेस पठन करावा आणि  ते शक्य नसल्यास बजरंग बाण एकदा तरी वाचला तरी चालेल.

हनुमान हे अशुभ शक्ती पासून संरक्षण करणारे दैवत आहे त्यामुळे हनुमानाचे बिभीषणकृत वडवानल स्तोत्र वाचल्यास फायदेशीर ठरेल हनुमान यांना नैवैद्य म्हणून बुंदी लाडू द्यावे.    


हनुमान वडवानल स्तोत्र  -

विनियोगः- ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिःश्रीहनुमान् वडवानल देवताह्रां बीजम्ह्रीं शक्तिंसौं कीलकंमम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थेसर्व-शत्रुक्षयार्थे सकल-राज-कुल-संमोहनार्थेमम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।
ध्यानः-
मनोजवं मारुत-तुल्य-वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानर-यूथ-मुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वरद्वयाहिक-ज्वरत्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वरसंताप-ज्वरविषम-ज्वरताप-ज्वरमाहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।


।। इति विभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं ।।



Sunday 5 April 2020

अक्षय तृतीय


अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे सतगुरूंची कृपा हि अशीच कधीही क्षय न होणारी असते शिष्य कितीही रागावला किवा दूर असला तरी त्यांची शिष्याप्रती असणारी कृपादृष्टी हि दिवसानुदिवस वाढतच जाते. त्याच प्रमाणे भगवंताची कृपाद्रुष्टी असते मनुष्य योनी सोडून जसे भूत, पिशाच्च, देव, गंधर्व, किन्नर यांनी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वचन दिले तर ते मोडत नाही फ़क़्त मनुष्यच आपल्या स्वार्थी स्वभावानुसार आपण दिलेले वचन तोडून फ़क़्त आपलेच हित चिंतीत असतो.

अक्षय तृतीया या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याचे फळ हे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभआशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. त्यांना यथोचित तर्पण देऊन तृप्त करावे. मोक्ष गायत्री मंत्र जप करून त्यांना मोक्ष प्राप्त करून द्यावा. आपल्या जीवनातील ऐश्वर्य, कीर्ती, संतती, आयुष्य, मोक्ष प्राप्ती हे पितृ देवतांच्या हातात असते त्यामुळे त्यांचा  आदर करून सर्व प्राप्त करून घ्यावे.

मोक्ष गायत्री मंत्र -     
पितरांच्या नावाने ७ पिंड बनवून त्याबरोबर तुपाची ज्योत लावावी , त्याची पूजा करावी , मातीच्या मडक्यात गंगा जल आणि पंचामृत टाकून समोर ठेवावे , वरील मंत्राचा १५१ वेळेस जप करावा , शंखाच्या सहाय्याने ५-५ वेळेस पाणी वाहावे , खीर, हलवा पुडी इत्यादी पंचपक्वान्नचा नैवेद्य दाखवावा. 

सत नमो आदेश | गुरूजी को आदेश | ॐ गुरूजी | ॐ सों का सकल पसारा , अक्षय योगी सबसे न्यारा | सद्राला तोड़ चौदह चौकी यम की तोड़ हंसा ल्याऊ मोड़ हंसा तो ला कहा धरे अलष पुरुष की सीम  , हंस तो  निर्भय भया काल गया सिर फोड़ निराकार के जोत मै रती न खणड़ी हो , कौन कौन साधू भया ब्रम्हा विष्णु महेश , वे साधू ऐसे भये यम ने पकडे केश , मोक्ष गायत्री जाप सम्पूर्ण भया | श्री नाथजी गुरूजी को आदेश | आदेश | आदेश |  

Saturday 4 April 2020

मी नंदेशनाथ - २८

अनेकांचे म्हणणे असते ध्यानाला बसलो कि मन सैरभैर होते. लक्ष एकाच ठिकाणी राहत नाही सारखे काही विचार येत असतात किती लक्ष एकवटण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही आणि मग ध्यान होत नाही.

मुळात ध्यान हि कल्पना म्हणजे आपले विचार शून्य करणे नाहीये मन हे चंचल असते त्याला थांबवू शकत नाही जर ते थांबले तर आपल्या भावना नष्ट होतील आपले मन एका क्षणात अब्जावधीचे अंतर पार करून जाऊ शकते त्यामुळे त्याला जर एकाच ठिकाणी  अडकवले तर  कल्पनाशक्तीच्या जोरावर आज पर्यंत जे अजरामर लिखाण केले गेलेले आहे ते यापुढे होणार नाही त्यामुळे आधी मनाला विनाकारण त्रास देन किवा दडपून ठेवण बंद केल पाहिजेल.

आपण सर्व गृहस्थी धर्माचे पालन करणारे आहोत सर्व कामकाज, व्यापार करून भगवंताला वेळ देतो हे त्याच्यावर केलेले उपकारच आहेत खर तर. दिवसभर केलेल्या कामाची आठवण हि ध्यान करताना येणारच आहे फ़क़्त आपल्याला त्याच्या वेग कमी करायचा आहे आज ध्यान करायला बसलो आणि ३ तास ध्यान लागले असे एक दिवसात होऊ शकत नाही त्यासाठी वर्षोनुवर्षे सवय करावी लागते.

ध्यानाची सुरवात हि प्राणायाम आणि योगासन यांनी करायला हवी. अति त्यांच्या आहारी जाऊ नये जे प्राणायाम करून आपला श्वासोच्छवास हा शुद्ध म्हणजे आपल्याला समजेल असा होणार आहे तेवढेच करावे जास्तीत जास्त १ किवा २ त्यापेक्षा जास्त नको आणि मग विशिष्ट मंत्राचा जप करावा आणि अनुभव घ्यावा.


मी नंदेशनाथ - २७ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

Friday 3 April 2020

मी नंदेशनाथ - २७

सध्या रामायण, महाभारत सिरीयल सुरु झाल्या आहेत त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. बारकाईने बघितल्यास त्यातील अत्यंत महत्वाचे दुवे आपल्याला पाहायला मिळतात. जसे भगवान श्रीराम यांचे गुरुप्रेम, पितृपेम, मातृप्रेम, बंधुप्रेम, पत्नीप्रेम  यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन अथवा तडजोड हि होऊच शकत नाही आणि सर्वान मध्ये समतोल कसा साधावा याचे उत्तम उदाहरण दिले आहे.

एक महत्वाची गोष्ट नमूद कराविशी वाटते आहे कि ज्याप्रमाणे गुरु वशिष्ठ  यांना सर्व प्रकारची विद्या अवगत होती सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना होते, द्रुष्टी त्यांना होती त्यांनी ठरवले असते तर अल्प कालावधीत सर्व राक्षसांचा वध करूण पृथ्वी भयमुक्त केली असती  तरीही त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांनाच राक्षसांचा वध करण्यासाठी उचित समजले कारण जे कार्य नियतीने ज्याच्या हातून लिहिलेले असते ते त्यालाच करावे लागते. आपण त्यात कुठलेही प्रकारचे कारण दिले तरी नियती ते कार्य तुमच्या कडून करूनच घेते. कोणत्याही प्रकारचा कंटाळा केला किवा वेळ नाही,जमत नाही असे सांगितले तरी ते कार्य तुम्हालाच करावे लागणार आहे हे लक्षात असू द्या या जन्मात जर हे कार्य पूर्ण झाले नाही तर तुम्हाला पुढचा जन्म घेऊन ते कार्य पूर्ण करावे लागते, तुम्ही पुढचा जन्म घेतला म्हणजे तुमच्या गुरुंना सुद्धा पुढचा जन्म घ्यावा लागतो ते कार्य करून घेण्यासाठी. त्यामुळे आपल्या सतगुरूंनी सांगितलेले कार्य हे कुठलिही तडजोड न करता पूर्ण करावे.

राज्याभिषेकाच्या अदल्यादिवशी गुरु वशिष्ठ हे श्रीराम यांना चटई वर झोपायला सांगतात यावरून त्यांना पुढे काय होणार आहे याची नक्कीच कल्पना होती हे समजते रामाचा राज्याभिषेक होणार नाही आणि श्रीराम यांना वनवास भोगावा लागणार आहे त्यासाठीची ती तयारी म्हणून वशिष्ठ तसे सांगतात. आपल्या सतगुरूंना आपल्यावर येण्याऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल लागलेली असते त्यातून सहज तारूनकशा प्रकारे जायचे याचे देखील त्यांच्याकडे उत्तर असते अनेक प्रकारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्याला त्याचे अवलोकन होत नाही आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे संशय घेऊन बघू लागतो किवा हे मलाच का सांगितले दुसऱ्यांना का नाही करायला लावले असे निरर्थक प्रश्न निर्माण करतो.

गुरु वशिष्ठ रामांना पायी चालण्याची सवय असू द्या पुढे तुम्हास कामी येणार आहे असे सांगतात त्यावरून गुरुआज्ञा म्हणून श्रीराम त्याचे पालन करतात परंतु आपल्या गुरुंना ते कोणतेही कारण विचारात नाही. सतगुरूंनी सांगितलेला शब्द प्रमाण धरून ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. आपल्याकडे आपल्या गुरुंनी सांगितल्या नंतर ती आज्ञा पाळणे सोडून त्याचे कारण काय? किती दिवस मला तसे करावे लागणार आहे? आणि मीच हे करावे का? माझ्या कडून काही चुकले आहे आहे ज्यामुळे तुम्ही मला हे करायला लावले आहे? असे प्रश्न निर्माण होतात आणि आपनच सर्व कार्यावर पाणी फिरवतो.

आदेश

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...