Friday 3 April 2020

मी नंदेशनाथ - २७

सध्या रामायण, महाभारत सिरीयल सुरु झाल्या आहेत त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. बारकाईने बघितल्यास त्यातील अत्यंत महत्वाचे दुवे आपल्याला पाहायला मिळतात. जसे भगवान श्रीराम यांचे गुरुप्रेम, पितृपेम, मातृप्रेम, बंधुप्रेम, पत्नीप्रेम  यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधन अथवा तडजोड हि होऊच शकत नाही आणि सर्वान मध्ये समतोल कसा साधावा याचे उत्तम उदाहरण दिले आहे.

एक महत्वाची गोष्ट नमूद कराविशी वाटते आहे कि ज्याप्रमाणे गुरु वशिष्ठ  यांना सर्व प्रकारची विद्या अवगत होती सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना होते, द्रुष्टी त्यांना होती त्यांनी ठरवले असते तर अल्प कालावधीत सर्व राक्षसांचा वध करूण पृथ्वी भयमुक्त केली असती  तरीही त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांनाच राक्षसांचा वध करण्यासाठी उचित समजले कारण जे कार्य नियतीने ज्याच्या हातून लिहिलेले असते ते त्यालाच करावे लागते. आपण त्यात कुठलेही प्रकारचे कारण दिले तरी नियती ते कार्य तुमच्या कडून करूनच घेते. कोणत्याही प्रकारचा कंटाळा केला किवा वेळ नाही,जमत नाही असे सांगितले तरी ते कार्य तुम्हालाच करावे लागणार आहे हे लक्षात असू द्या या जन्मात जर हे कार्य पूर्ण झाले नाही तर तुम्हाला पुढचा जन्म घेऊन ते कार्य पूर्ण करावे लागते, तुम्ही पुढचा जन्म घेतला म्हणजे तुमच्या गुरुंना सुद्धा पुढचा जन्म घ्यावा लागतो ते कार्य करून घेण्यासाठी. त्यामुळे आपल्या सतगुरूंनी सांगितलेले कार्य हे कुठलिही तडजोड न करता पूर्ण करावे.

राज्याभिषेकाच्या अदल्यादिवशी गुरु वशिष्ठ हे श्रीराम यांना चटई वर झोपायला सांगतात यावरून त्यांना पुढे काय होणार आहे याची नक्कीच कल्पना होती हे समजते रामाचा राज्याभिषेक होणार नाही आणि श्रीराम यांना वनवास भोगावा लागणार आहे त्यासाठीची ती तयारी म्हणून वशिष्ठ तसे सांगतात. आपल्या सतगुरूंना आपल्यावर येण्याऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल लागलेली असते त्यातून सहज तारूनकशा प्रकारे जायचे याचे देखील त्यांच्याकडे उत्तर असते अनेक प्रकारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्याला त्याचे अवलोकन होत नाही आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे संशय घेऊन बघू लागतो किवा हे मलाच का सांगितले दुसऱ्यांना का नाही करायला लावले असे निरर्थक प्रश्न निर्माण करतो.

गुरु वशिष्ठ रामांना पायी चालण्याची सवय असू द्या पुढे तुम्हास कामी येणार आहे असे सांगतात त्यावरून गुरुआज्ञा म्हणून श्रीराम त्याचे पालन करतात परंतु आपल्या गुरुंना ते कोणतेही कारण विचारात नाही. सतगुरूंनी सांगितलेला शब्द प्रमाण धरून ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. आपल्याकडे आपल्या गुरुंनी सांगितल्या नंतर ती आज्ञा पाळणे सोडून त्याचे कारण काय? किती दिवस मला तसे करावे लागणार आहे? आणि मीच हे करावे का? माझ्या कडून काही चुकले आहे आहे ज्यामुळे तुम्ही मला हे करायला लावले आहे? असे प्रश्न निर्माण होतात आणि आपनच सर्व कार्यावर पाणी फिरवतो.

आदेश

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

32 comments:

  1. सुन्दर माहिती दिली तुम्ही नांदेशनाथ जी

    ReplyDelete
  2. आत्म परीक्षण करायला लावणारा लेख
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. यातून खूप काही शिकता येईल ,नंदेश नाथ तुमचे खूप धन्यवाद

    ReplyDelete
  4. Nice written in different way

    ReplyDelete
  5. 🙏 🙏 वा नन्देश नाथ जी तुमच्या कडुन जे लिखाण होतं आहे ते खूपच अप्रतिम आहे ....प्रत्येक लेख वाचून झाल्यावर स्वतः मधे डोकावून पाहिले जाते ...कुठे कमतरता आहे हे पाहण्यासाठी 🙏 🙏

    ReplyDelete
  6. प्रत्यक्ष श्री रामाला त्यांच्या गुरू चे आशिर्वाद मिळाले व ते किती गरजेचे होते ते समजले. आपण तर कित्ती शूद्र त्यांच्या समोर. तरी आपल्याला गुरू लाभले हे किती मोठे भाग्य. नंदेशनाथ खूप सुंदर समजून सांगितले आहे. धन्यवाद. गुरू आदेश शिरसावंद्य.

    ReplyDelete
  7. खूप सुंदर नंदेशनाथ

    ReplyDelete
  8. Thank you so much nandesh nath

    ReplyDelete
  9. Thank you so much for these kind words ! Its blissful

    ReplyDelete
  10. Nice information written and given to us thanks very much.

    ReplyDelete
  11. खूपच छान नंदेशनाथ

    ReplyDelete
  12. खरंच मालिकेतून शिकण्या सारखे खूप काही आहे , तुम्ही दाखविलेले बारकावे आधी लक्षात नाही आले पण आता ते समजण्याचा पूर्ण प्रयत्न करू.. धन्यवाद नंदेशनाथ जी

    ReplyDelete
  13. खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद नंदेशनाथ

    ReplyDelete
  14. नंदेश नाथ अप्रतिम मांडणी। अचूक शब्दरचना ।

    ReplyDelete
  15. विजय कुलकर्णी4 April 2020 at 09:39

    खूपच विस्तृत आणि मार्मिक विवेचन

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...