Friday, 10 January 2020

मी नंदेशनाथ - २०

आजच्या कलियुगात आपल्याला समाजात राहायचे असेल तर वेगळे आहोत असे वागून चालणार नाही भक्ती करून आपणही त्यातीलच एक आहोत हे दर्शवले पाहिजेल. नाथपंथात अनेक साधना अशा आहेत ज्या रात्रीकाल मधे करायच्या असतात कारण रात्रीकाल मध्ये त्या देवतेशी संबंधित स्पंदने जास्त कार्यरत असतात कितीही लोकांना महत्व सांगितले तरी त्यांना तो अघोरी प्रयोग वाटतो. हवन हे नाथपंथाचे मुख्य अंग आहे विशिष्ठ साधना कालभैरव जे रक्षणाचे कार्य करतात, धूमावती शारीरिक रोग बरे करते, बगलामुखी शत्रूपिडा साठी उपयुक्त आहे असे हवन रात्री केल्यास चांगले फळ देतात. तेच गणपती बुद्धी देतो, संकटांचे हरण करतो,  भुवनेश्वरी ऐश्वर्य प्रदान करते हे हवन सकाळी करावे. मंत्र-हवन करताना खूप मोठ्याने मंत्र जाप करू नये आपल्याला स्वत ला ऐकायला येईल एवढ्याच आवाजात म्हणावा.

महाराष्ट्रात गणपती, हनुमान, नवनाथ, कालभैरव, साडेतीन पीठे यांचीच नित्य नियमाने पूजा-अर्चा, हवन होते आधीच सांगीतल्याप्रमाणे प्रत्येक देवतेचे कार्य वेगळे आहे सर्वाना समान स्थान दिलेच गेले पाहिजेल दशमहाविद्या, अष्टभैरव  ज्याच्या बद्दल अनेक लोकांना माहित सुध्दा नाहीये फ़क़्त घरात वास्तृशांती, सत्यनारायण, नवचंडी करायची सर्वाना जेवायला बोलवायचे आणि स्वताला धार्मिक म्हणवून घ्यायचे हि आपली परिस्थिती आहे.

जमिनीत, शेतात आगीच्या समस्या आहेत,चोरीच्या समस्या आहेत त्या आपल्या आराध्याला सांगून त्यांचे निरासन होणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी एखाद्या देवतेचे स्थान असते (म्हसोबा) तिथे त्यांना मान देणे गरजेचे आहे जे काम लिपिकाकडून होणार आहे त्या साठी जिल्हाधिकारी यांना त्रास देणे योग्य नाही आणि ते समजण्यासाठी अनुभवाचा आभ्यास महत्वाचा आहे.


मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

8 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...