Sunday 5 May 2024

श्राद्ध न करनेसे हानि


अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठानके लिये तत्पर रहना अत्यन्त आवश्यक है। यह सर्वविदित है कि मृत व्यक्ति इस महायात्रामें अपना स्थूल शरीर भी नहीं ले जा सकता है तब पाथेय (अन्न-जल) कैसे ने जा सकता है? उस समय उसके सगे-सम्बन्धी श्राद्धविधिसे उसे जो कुछ देते हैं, वही उसे मिलता है। शास्त्रने मरणोपरान्त पिण्डदानकी व्यवस्था की है। सर्वप्रथम शवयात्राके अन्तर्गत छः पिण्ड दिये जाते हैं, जनसे भूमिके अधिष्ठातृ देवताओंकी प्रसन्नता तथा भूत-पिशाचोंद्वारा होनेवाली बाधाओंका निराकरण आदि बयोजन सिद्ध होते हैं। इसके साथ ही दशगात्रमें दिये जानेवाले दस पिण्डोंके द्वारा जीवको आतिवाहिक सूक्ष्म गरीरकी प्राप्ति होती है। यह मृत व्यक्तिकी महायात्राके प्रारम्भकी बात हुई। अब आगे उसे पाथेय (रास्तेके नोजन- अन्न-जल आदि) की आवश्यकता पड़ती है, जो उत्तमषोडशीमें दिये जानेवाले पिण्डदानसे उसे ाप्त होता है। यदि सगे-सम्बन्धी, पुत्र-पौत्रादि न दें तो भूख-प्याससे उसे वहाँ बहुत दारुण दुःख होता है।

Sunday 21 April 2024

यंत्र आणि यंत्रसिद्धी

यंत्र आणि यंत्रसिद्धी

भारतीय संस्कृती आणि साधना ह्या दृष्टीने पाहिले तर मध्ययुग, हा योग आणि तांत्रिक साधना यांचा सुवर्णकाळ होता. ह्या युगात ज्या संप्रदायांचा जन्म झाला त्यात नाथसंप्रदायाला फार महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. ह्याच युगामध्ये अवतीर्ण झालेल्या संत- मतालाही कमी महत्वाचे स्थान आहे असे म्हणता येणार नाही. नाथमार्गाचे अनुयायी ज्ञानमार्गाचेही पथिक झालेले होते. तेव्हा संतमताने निर्गुण सगुण परमात्मतत्त्वाचे अनुशीलन चालविले होते.

नाथ ह्या शब्दामधील 'ना' ह्या अक्षराचा अर्थ अनादी रूप व 'थ' हथा अक्षराचा अर्थ भुवनत्रयामध्ये स्थापित होणे. नाथ हे असे एक तत्त्व आहे की जे अनादी आहे आणि जे भुवनत्रयाच्या स्थितीला एकमात्र कारण आहे.

नाथ संप्रदायाचे एकमात्र चरम लक्ष्य आहे अद्वय भाव; म्हणजेच कैवल्यपदाची प्राप्ती. ह्यासाठी सर्वप्रथम सद्‌गुरूच्या कृपेने चित्त-विश्रांती लाभ अवश्य मिळायला हवा, कारण त्याविना सामरस्थाची माप्ती संभत्रनीय नाही. जोपर्यंत चित्त देहात्ममूलक क्षोमा- पासून मुक्त झाले नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही आणि ययार्थ साधनेचा प्रारंभसुद्धा होणार नाही. चित्तशांतीमुळे बहुधा भगवदानंद मिळतो आणि अनंत ज्योतींचा आविर्भात्रहोतो. ह्या अद्वैत प्रकाशाने द्वैतभाव निवृत्त होतो, वित्रशक्तीवा प्रकाश पवतो आणि योगी निज देहाचे पूर्ण शान प्राप्त करतो. याचे फळ म्हणजे फायसिद्धी भयया पिण्वसिद्धी. याचे नामांतर म्हणजे देहाचे अमरत्व. तीच सिद्धदेह अवस्था होय

हया लक्ष्याच्या सिद्धीसाठी नाथसंप्रदायाने कुंडलिनी साधनेचा म्हणजेच षट्- चक्रभेदनाचा आश्रय घेतला आहे. राजयोगात पारंगत झाल्यावर कुंडलिनी साधनेचा मार्ग सुलभ होतो आणि षट्चक्रभेदनाची प्रक्रिया प्रशस्त होते.

साधनेच्या दृष्टिकोनातून मानत्री शरीराला फारच महत्त्व आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी भटकून झाल्यानंतर, परमात्म्याच्या अनुकंपेने जिवाला मानवी शरीराचा लाभ होतो. मानवी शरीराला महत्त्व मिळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सान्या विश्वाचे नियंत्रण करणारी पराशक्ती आपली सर्वश्रेष्ठ लीला बहुधा मानवी शरीराच्या माध्यमानेच प्रगट करते. ह्या आधारावरच देशकालाला अनुसरून अनेक गुप्त साधना, रहस्यमय उपासना आणि त्यांची कार्ये शात झाली. त्या 'तंत्र' इथा नावानेच प्रसिद्ध आहेत. तंत्र याचा अर्थ ज्ञानाचा विस्तार. कुंडलिनी हे पराशक्तीचे नामांतर आहे. ती महामाया महाविद्या रूप आहे. तिचे मूलकेंद्र मूलाधार चक्र आहे आणि उरलेल्या पाच चक्रांचा भेद ती क्रमाक्रमानेच करते. ती तिच्या विकासाची केंद्रे आहेत. हया सहा चक्रांखेरीज अथवा केंद्रांखेरीज आणखी तीन केंद्रे आहेत. कपाळाचा प्रदेश तीन मुख्य भार्गात विभागला गेला आहे.

१. मुख्य मस्तिष्क, २. लघु मस्तिष्क आणि ३. अषः मस्तिष्क अशी नावे आहेत. हे तीन भाग म्हणजे चक्रे अथवा तीन केंद्रे आहेत. तिसन्या भागाला योग- शास्त्रामध्ये सहस्रार चक्र म्हणतात ज्याच्या मुळाशी ब्रह्मरंध्र आहे. हथा नऊ केंद्रां- पैकी सात केंद्रांचा संबंध विश्वब्रह्माण्डाच्या सात भागाशी आहे. योगीगण हथामध्ये स्थित होऊन संबंधित लोक लोकांतराशी संबंध स्थापित करतात. हथा संबंधकालाचे नाव समाधी असे आहे. समाधी ही एक उच्च अवस्था आहे. त्या अवस्थेत प्रवेश करून योगीगण वेगवेगळ्या लोकांत भ्रमण करतात आणि तेथील निवासाशी अथवा मानवेतर दिव्य प्राण्यांशी संबंध स्थापन करतात. आणि विशिष्ट ज्ञान-विज्ञानाला उपलब्ध करून देतात. शरीरातील नऊ चक्रे ही नऊ शक्तिकेंद्रे आहेत. योगीगण मुख्यतः त्याच शक्तीचा अवलंब करतात. साधन राज्यातील ती यंत्र विशेष आहेत. जवळजवळ वीस वर्षांपूर्वी काशीच्या नारद घाटावर प्रच्छन्न रूपाने निवास करणान्या गुप्त तंत्रसाधक तरणी कोद ठाकूर यांना ह्या केंद्ररूपी यंत्रांविषयी बरेच शान होते, एक दिवस त्यांनी दाखवून दिले की, शक्तीचे जे सृष्टिरूप आहे ते योनिरूप आहे. म्हणूनच त्या केंद्राचे प्रतीक योनिप्रतीक त्रिकोण आहे. प्रत्येक केंद्राच्या शक्तीमुळे चार चार तत्त्वांची उत्पत्ती होते. हथाप्रमाणे ३६ तत्त्वांच्या ३६ वर्णमालिकांचा आविर्भाव होतो. प्रथम एक मूळ अथवा आदिपराशक्ती नऊ रूपांमध्ये विभक्त होते. नंतर त्या ३६ वर्णमातृकारूप ग्रहण करतात. 

कृ. म.बापटशात्री 


पतंजलयोग

पतंजलयोग

प्राणिमात्रांना हा भवसागर पार करता यावा म्हणून महर्षि पतंजलीनी योगत्वे अनुशासन केले. असे सांगतात की हिरण्यगर्भाने रचलेली योगसूत्रे आज जरी लुप्त झालेली असली तरी त्याच्या प्रकाशात आणि आधारावर पतंजलीनी आपली योगसूत्रे रगलेली आहेत. त्यांनी अष्टांगयोगाचे प्रतिपादन केले आह

१ यम, २ नियम, ३ आसन, ४ प्राणायाम, ५ प्रत्याहार, ६ धारणा, ७ ध्यान व ८ समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यांनी ह्या आठ अंगांचे विस्तारपूर्वक असे आपल्या योगदर्शनात विवेचन करून सर्वांचे कल्याण केले. महाराजा भोज यांनी त्यांच्या ह्या योगसूत्रांची स्तुती केली आहे.

अंतःकरणाच्या अज्ञानमय अंधकाराचे निवारण करण्यासाठी चंद्रम्याच्या किरणा- प्रमाणे प्रकाशित करणारी अशी ती योगसूत्रे आहेत. त्या योगसूत्रांचे साधुपुरुष निरंतर अनुशीलन करतात व त्यामुळे त्यांचे मन आनंदमय बनते.

" जयन्ति वाचः फणिभर्तुरान्तर स्फुरत्तमस्तो मनिष्णकरत्विषः । विभाव्यमानः सततं मनांसि याः सतां सदानन्दमयानि कुर्वते ॥

महायोगी श्रीगोरक्षनाथ यांनी षडांग योगाचे विधान केले आहे. त्यांनी महर्षि पतंजलीची पहिली दोन अंगे-यम आणि नियम यांना आपल्या षडांग योगामध्ये यसहज अनुस्त केले आहे. 

Friday 5 April 2024

भारतीय काल गणना

६० विपळे = १ पळ

६० पळे = १ पत्रिका

२ घटिका = १ मुहूर्त

३० मुहूर्त किया ६० घटिका १ विवस (अहोरात्र)

१५ विवस = १ पक्ष

२ पक्ष = १ महिना

२ महिने = १ ऋतु

३ प्रऋतु किवा ६ महिने १ अमन

२ अयने किवा १२ महिने = १ वर्ष




इंग्रजी पद्धतीशी तिची तुलना

६० प्रतिविपळे = १ विपळ

२॥ विपळे = १ सेकंद

२१॥ पळे किवा ६० सेकंद १ मिनिट

१ घटिका २४ मिनिटे

२।। पटिका किया ६० मिनिटे १ तास

७।। घटिका किवा ३ तास १ प्रहर ८ प्रहर किवा २४ तास १ विवस

३६५ दिवस = १ वर्ष

yog marg (योग मार्ग) ६ - खेचरी मुद्रा

जिभेचे छेदन, चालन आणि दोहन करून, जीभ लांब करायची आणि ती कपालकुहरामध्ये प्रविष्ट करायची म्हणजेच भ्रूमध्यावर दृष्टी लावायची याला खेचरी- मुद्रा म्हणतात. खेचरी मुद्रेचे फळ काय आहे तर लंबिकाच्या ऊर्ध्वामध्ये स्थित असलेले के कंठविवर आहे तेथून खेचरीमुद्रेद्वारा बिंदुपात न होऊ देणे मग व्यक्ति स्त्रीच्या बाहुमध्ये आलिंगन बद्ध असो अगर नसो. जर भगमंडलामध्ये बिंदू पडलाच तर शक्तीच्या सहाय्याने योनिमुद्रेच्या सहाय्याने त्याचे ऊध्र्वोत्यान होऊ शकते. ऊर्ध्वजिव्ह होऊन सोमपान केल्याने निदान एक दोन महिने तरी मृत्यूवर विजय प्राप्त करता येतो.

विपरीतकरणी मुद्रा अथवा नभोमुद्रा हे विधान करून सुद्धा अमृताची प्राप्ती करता येते.

नाडीशुद्धी केल्याने बिंदुस्थैर्य होते. नाडीशुद्धी, सुषुम्ना मार्ग यांच्या स्वच्छते- मुळे प्राण मनाचा सुषुम्नेमध्ये प्रवेश होतो व तेच शिवसामरस्य आहे.

yog marg ५ ( योग मार्ग)

ज्ञानी झाला म्हणून काही कुणी योगी होत नसतो. आणि योगी झाल्याविना सत्यज्ञानाची प्राप्ती होत नसते. योग्यालासुद्धा शानाची आवश्यकताच आहे. अशा प्रकारे योग आणि ज्ञान परस्परांना सहाय्यकच आहेत. तरीसुद्धा योग हा श्रेष्ठ आहे. ज्ञान कनिष्ठ आहे. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात चार अवस्था प्राप्त होतात -

१) गुरु आणि भगवान यांच्या कृपाप्रसादाने पौरुष आणि अज्ञान दूर होते, 
२) आपल्या साधनेमुळे माणसाला ह्या जन्माचे बौद्धिक ज्ञान प्राप्त होते.

३) बौद्धिक शानाचा उदय झाल्यामुळे बौद्धिक अज्ञानाचा नाश होतो.

४) पौरुषज्ञानाचा उदय होतो.

साधनेच्या द्वारे जर का बौद्धिक शान झाले नाही, त्या ज्ञानाचा उदय झाला नाही तर, तर त्याबरोबर पौरुष ज्ञानाचा उदय झाल्यामुळे आपली बुद्धी आपल्या ज्ञानाला प्रतिबंध करील. ह्या अवस्थेला दूर करण्यासाठी साधनेचे प्रयोजन आहे. गरुदीक्षा घेतल्यानंतरसुद्धा जर शानदीप प्रज्वलित झाला नाही तर आणि जीवनकालात जर का साधनेद्वारा जीवाचे आवरण अंधकार नष्ट झाला नाही तर मृत्यू झाल्यावर ते आवरण आपोआप नष्ट होते. म्हणूनच गुरूच्या सहाय्याने प्रज्वलित झालेला ज्ञान- दीप आपोआपच प्रज्वलित होतो. कारण एकदा प्रकाशित झालेला तो ज्ञानदीप पुन्हा विश्वला जात नाही.

नाथमार्गामध्ये ज्ञान आणि योग यांचे दोन अवस्थांच्या रूपामध्ये विवेचन आहे. सर्व प्रथम गुरुज्ञान प्रदान केले जाते, मग योगसाधना. योगाविना महाज्ञानाचा उदय कधीच होणार नाही. गुरूच्या सहाय्याने साधकाची दृष्टी आणि शक्ती उन्मुक्त होते आणि मग त्याला महाज्ञानाची प्राप्ती होते.

yog prakar (योग प्रकार)

१. मंत्रयोग, २. स्पर्शयोग, ३. भावयोग, ४. अभावयोग, आणि ५. महायोग.

मंत्रजपाचा अभ्यासवश मंत्राचा वाच्यार्थ, स्थित झालेली विक्षेपरहित मनाची जी अवस्था तो मंत्रयोग, मनाच्या त्याच वृत्तीने जर प्राणायामाला प्राधान्य दिले तर तो स्पर्शयोग, तोच स्पर्शयोग जर मंत्राच्या स्पर्शाने रहित झाला तर तो भात्रयोग. ज्याच्या- मध्ये संपूर्ण विश्वाचे रूपमात्राचे अवयव विलीन होतात त्यालाच अभावयोग म्हणतात. ह्यावेळी सद् वस्तूचे भान राहात नसते. त्याच्यात एकमात्र उपाधीशून्य शिवस्वभावाचे चिंतन बाकी उरते आणि मनाची वृत्ती शिवमयच होते. यालाच महायोग असे नाव आहे. बहुधा सर्व योग आठ अथवा सहा अंर्गानी युक्त आहेत. उपमन्यूने कथन केलेल्या महायोगाच्या विवरणामध्ये गोरक्षनाथ प्रतिपादित महायोगा मृत महाज्ञान याचेव तत्त्व अधिकतर सन्निहित आहे.

yog marg (योग मार्ग) ४

गोरखनाथांनी प्रतिपादलेल्या योगामृतमार्गामध्ये हेच अव्यक्त, अक्षर, शून्य, निरंजनपद ही परमानुभूती आहे. ही परमानुभूती योगाभ्यास, तन, मन, प्राण यत्ति संशोधन, अपरा कुंडलिनी जागरण, परा कुंडलिनी शक्तीची संभिती, नवचक्रभेदनाचे फलस्वरूप सहलारकडे सतत प्रवाहित झालेले परमामृतरसाच्या आस्वादनात सन्निहित आहे. परमशिवाच्या अनुवहानेच संभवनीय आहे. हया परमानुभूतीची प्राप्ती हाच गोरक्षयोगाचा परम-चरम उद्देश आहे. गोरखनाथांच्या योगामृतमध्ये आंतरिक साधना हीच प्रधान आहे. बाहय अभ्यास हा पूरकमात्र आहे. त्यामुळे सिद्ध देइ प्राप्त झाल्यामुळे शून्यपदात सहज विश्रांती मिळते.

भगवान् गोरखनाथांचे योगामृत महाज्ञान सनातन योग वाङ्मयाचे आदि स्वरूप आहे. कारण ते साक्षात् शिवप्रवर्तित आहे. महर्षी पतंजलींनी इथा महाज्ञानाची अनुशासनक्रिया दिली आहे.

गोरखयोगाची अशी विशिष्टता आहे की, त्यांनी योगशासन अथवा योग- प्रवर्तन केले. अनुशासन केले नाही. महर्षी पतंजलीनी अनुशासन केले, पातंजली - योगसूत्रे शिवप्रवर्तित - शिवगोरक्ष निर्दिष्ट योगज्ञानाचे महाभाष्य समजले जाते. तर त्यात फारशी अतिशयोक्ती आहे असे म्हणता येणार नाही. गोरक्षयोगाची हीच स्वीकृती आहे. पातंजल योगसूत्रे ह्या स्वीकृतीची परिपूर्ती आहे, अथवा विस्तृती आहे. हे केवळ अनुमान आहे असे मात्र समजता कामा नये. असे प्रतीत होते की, गोरक्ष- योग ज्ञानप्रकाशात सनातन परमात्मा शिवशंभोच्या अमृतस्वादनामध्ये हे प्रतिपादन संगत आहे ते उचित आहे. भगवान् गोरखनाथ योगीराजराजेश्वर आहेत. साक्षाद् शिवस्वरूप महायोगविज्ञानी अमरकाय योगसिद्ध आहेत. त्यांचे योगामृत अक्षय आणि निर्विकार आहे.

परमात्मा आपल्या शिवस्वरूपात आणि विष्णुस्वरूपात सदा योगीच आहे. योगीश्वर आहे. सर्व कामद आहे. शिवशंभो आणि श्री विष्णु यांच्यात भिन्नता नाही. अध्यात्मशास्त्रात ह्या अभिन्नतेचे प्रतिपादन केलेले आढळेल.

Sunday 31 March 2024

योग मार्ग - ३ (yog marg)

गीतेत सांख्यालाही 'योगच' म्हटले आहे. भक्तीला सुद्धा 'योगच ' म्हटले आहे. कर्तव्यबुद्धीने संपादित कर्मालाही 'योगच' म्हटले आहे व आसन, प्राणायाम इत्यादींना सुद्धा 'योगच' म्हटले आहे.

साधकांची जशी प्रकृती, जशी रुची, जशी शक्ती, जशी अवस्था त्याप्रमाणे तो भापल्याला अनुकूल असा जो योगमार्ग त्याचा अवलंब करतो. योगयुक्त बुद्धीला धरून, एकान्तिक निष्ठेने साधना करीत रहातो व कृतार्थ बनतो

योगीराज गोरखनाथांनी योगसाधना प्रचलित करण्यासाठी आणि योगी-संप्रदाय प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्या काही शाखा बनविल्या. भिन्न भिन्न स्थानांवर आश्रमांची स्थापना केली, शिक्षणाची केंद्रे स्थापन केली आणि आपल्या शिष्यांच्या द्वारे, त्यांनी समग्र भारतात योगधर्माच्या प्रसाराची व्यवस्था केली.

उदारचरित असे ज्ञानी लोक आणि योगी लोक, कोणत्याही देवतेच्या उपासनेची अवज्ञा करीत नसतात. ते सर्व देवदेवतांना प्रकृती पुरुषेश्वर, कल्याणगुणाकार भगवानाची त्रिभूतीच मानतात. ते असेही समजतात की, सर्व देवदेवतांच्या उपासनेने एकाच भगवानाची उपासना होते. तरीपण ते असेही पाहतात की, प्रधानतः महादेवाची, शिव- शंभूचीच उपासना केली जात आहे. शिवशंभो हा योगी लोकांचा आदर्श आहे. आणि तोच ज्ञानी लोकांचाही आदर्श आहे. शिवशंभो हे भगवती महामायेचे स्वामी आहेत, जे विश्वब्रह्मांडाचे अधिपती आहेत. तरीपण ते निर्लिप्त रहातात. उदासीन रहातात. आत्मसमाहित रहातात. ते मायेच्या विकाररूप दुनियेला संयमानेच टाळतात. ज्ञानाग्नीच्या सहाय्याने भस्मीभूत करतात. तेच भस्म आपल्या अंगाला चोपडतात. आणि साऱ्या विश्वाला आपल्यात प्रलीन करतात. आणि आत्मानंदात तल्लीन होऊन रहातात.

योग मार्ग २ (yog marg)

साधना केल्यानंतर देह आणि इंद्रिये स्थिर होतात. प्राणस्पंदन स्थिर क नियमीत होते. चित्तवृत्तीचा निरोध होतो. आणि मग निर्मल निस्तरंग विषयसंग रहित, आत्मसमाहित अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाशी आत्म्याचे स्वरूप प्रकाशित होते. हाच मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय आहे.

ज्ञानी लोक असे सांगतात की, विषयाचे अनित्यत्वादी दोष पाहिल्यानंतर, मनात असा विचार निर्माण होतो की, ह्या दृश्य जगताशी आत्म्याचा काडीचासुद्धा संबंध नाही. तसा दृढ निश्वय सुद्धा होतो. चित्त स्वभावतःच विषयविमुख होने. अगदी प्रशांत होते, कर्मप्रवृत्ती नष्ट होतात, आणि इंद्रिये स्थिर बनतात. देह, इंद्रिये, मन यांत मूलतः बासना वास करते आणि वासनेचे मूळ अज्ञानात आहे. अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली की, सर्व प्रकारच्या चंचलतेची निवृत्ती होते. त्यासाठी योगिक प्रक्रियेचे विशेष प्रयोजन ठरत नाही.

आत्मविषयक श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्यामुळे आत्मस्वरूपाचे अपरोक्ष साक्षात्कार होतो. माया आणि मायेमुळे निर्माण झालेले सारे पदार्थ याविषयी वैराग्य उत्पन्न होते. आत्मध्वरूप प्राप्त झाल्यामुळे मायेपासून तो मुक्त होतो.

दोन्ही मार्गाचे मत असे आहे की, आत्मा स्वभावतःच शुद्ध आणि मुक्त स्वभावाचा आहे. प्रकृतीचे अथवा मायेचे गुण दोष आत्म्यावर आरोपिले जातात. आणि आत्म्याला बद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्म्याला यथार्थ स्वरूपाची उप- छब्धी करून दिली की, मुक्तीचा लाभ होतो. हीच मुक्ती, दोन्ही मार्गांचे लक्ष्य आहे. परंतु त्यांची साधनप्रणाली ही वेगवेगळी आहे. साधनप्रणाली वेगवेगळी असली तरी दोन्हींचे साध्य एकच आहे.

योग मार्ग - १ (yog marg)

अगदी प्राचीन कालापासून परमार्थनिष्ठ मुमुक्षूना, मोक्ष प्राप्तीसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा योगमार्ग. ज्ञानमार्ग हा तात्त्विक विचारांचे उत्तम साधन आहे. शास्त्राच्या सहाय्याने त्या मार्गाने स्थूल आणि सूक्ष्म, ऐहिक आणि पारमार्थिक विषयांचे अनित्यत्व, अशुचित्व, दुःखकरत्व आणि मोहजनकत्व वगैरे दोष आणि त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यत्व, असंगत्व, निष्क्रियत्व, सुखदुःखादीविहिनत्व, कार्यकारणातीत्व, सत्यज्ञानस्विरूपत्व वगैरे गुणांची पर्यालोचना करून, विषयसंपर्क - त्वजनपूर्वक चित्ताला आत्मस्वरूपात अथवा ब्रह्मस्वरूपात समाहित करणे ह। ज्ञानमार्गाचा मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय होय. योगीलोक सांगतात की केवळ विचारद्वारा वैराग्याची प्रतिष्ठाही होते, आणि परमतत्त्वात स्थितीपण प्राप्त होत नाही. जोपर्यंत प्राणाचे स्पंदन अनियमीतपणे चालू आहे- देह आणि इंद्रिये अस्थिर रहातात अंतःकरणात वृत्तीचे तरंग उठतात, अर्थात् जोपर्यंत इच्छाशक्तीचा प्रभाव प्राणावर, देहावर, इंद्रियांवर स्थैर्य संपन्न करीत नाही, चित्ताचा निरोध करू शकत नाही, तोपर्यंत वासनांचे निर्मूलन होण्याची शक्यता नाही. चित्ताची चंचलता दूर होणार नाही. अंतःकरण आत्मस्वरूपात समाहित होणार नाही. आणि त्यामुळे मोक्षप्राप्तीसुद्धा होण्याची सुतराम शक्यता नाही.

म्हणूनच यम-नियमांचे महाव्रत आचरायला हवे. अनुष्ठानाने देह आणि इंद्रियांचे दमन करायला हवे आणि आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...