Tuesday 14 January 2020

मी नंदेशनाथ - २१

आत्मसमर्पण,निरपेक्ष भाव, हे शब्द खूप मोठे असून त्याचा अर्थ माहित नसलेले सुद्धा आज भगवंताजवळ एकरूप झालेले मी पाहिले आहे. कसलीही मोह माया नाही फ़क़्त भगवंत आणि मी हि भावना त्यांना त्या ठिकाणी नेते. अज्ञानात सुख असते या वाक्याचे सूत्र अध्यात्मात पाहायला मिळते अनेक पुस्तके वाचून तत्वज्ञानाचे संभाषण करून भगवंत मिळेल हि खात्री कोणीही देऊ शकत नाही.

जे माहित नाही त्याचा जास्त विचार करत बसू नये फ़क़्त मी जे करतो आहे त्यात सातत्य कसे ठेवता येईल हा विचार मनात असावा. काहींना ५० पेक्षा जास्त वर्ष लागू शकतात अनुभूती येण्याकरता तर काही १-२ वर्षात आपल्या पूर्वकर्मानुसार भगवंत भेट होऊ शकते इतके वर्ष सेवा केली तर हे मिळणारच हि अपेक्षा फोल आहे.

प्रत्येकात काही उणीवा आहेत त्याचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही भगवंत आपल्याला आपण जसे आहे तसे सांभाळतो स्वताला कमी लेखून विनाकारण त्याने दिलेल्या शरीराचा अपमान करू नये. जसे खोटी स्तुती ऐकू नये तसे आपण देखील कुणाची ती करू नये कारण समोरील व्यक्तीने त्यात केलेल्या पापांची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते.
     

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

5 comments:

  1. तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे नक्कीच आचरण करू

    ReplyDelete
  2. फार छान सांगतात तुम्ही नन्देश नाथ 👌आध्यत्मा मधे खरंच सातत्यता हवी .....

    ReplyDelete
  3. खूप छान सांगता तुम्ही नंदेशनाथ

    ReplyDelete
  4. सहज सुंदर विश्लेषण
    धन्यवाद👌

    ReplyDelete
  5. Adhyatmat satatya kiti mahantvache aahe hyavishayi khup chhan vivechan.

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...