Thursday 1 April 2021

स्थान

साधनेसाठी बसताना आपले स्थान खूप महत्वाचे असते. कारण तिथे आपण आपल्या साधना दैवत सोबतच आराध्य दैवत सुद्धा आमंत्रित करतो. ती जागा जितकी शुद्ध व चांगली असेल तितक्या वेळ साधना दैवत आपल्या सोबत थांबते. यात सुद्धा निर्माण होणारी स्पंदने ही लवकर तयार होतात. एखाद्या मंदिरात केलेली साधना ही जास्त लवकर फलदायी होते कारण तिथे आधीच्या साधकांनी केलेली साधना व पूजा यामुळे ती स्पंदने आधीपासूनच असतात.. व लवकरच ती आकर्षित होतात.
उदा. जर गणपती मंदिरात आपण गणपती साधना केली तर तेथील आधीच्या साधकांनी केलेल्या साधनेची स्पंदने व आपल्या साधनेतील तरंग एकत्र होऊन एक वेगळी प्रभावी शक्ती तयार होते. व साधनेचे इच्छित फलित लवकर प्राप्त होते किंवा साधना लवकर साध्य होते.

आता काही साधकांना सिद्धी प्राप्त असते व ते कोणत्याही जागी बसून साधना करताना सिद्धी द्वारे साधना दैवत आहे तिथे जाऊ शकतात. 


पण सर्वांना हे शक्य नसते अशा वेळी आपण आपले साधनेचे ठिकाण हे कसे शुद्ध असावे किंवा आपल्या साधना दैवतच्या जास्तीत जास्त कसे जवळ असावे हे पाहणे महत्वाचे आहे. साधनेची जागा ही कशी असावी ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे.. 
 आपले देवघर आपण जास्तीत जास्त स्वच्छ ठेवणे, नित्यनेमाने फुले इतर गोष्टी बदलणे तसेच दाखवलेला नैवेद्य इ गोष्टी यांची नन्तर साफसफाई करणे यातून त्या स्थानाची स्पंदने निर्माण करण्याची शक्ती वाढते. आपण बसल्यावर लावलेला धुपचा सुगंध तसेच दीप सुद्धा स्पंदन निर्माण करण्याची ऊर्जा देतो. थोडक्यात साधना ही स्पंदननिर्मिती आहे व ती करताना जास्तीत जास्त प्रभावी होण्यासाठी स्थान व इतर वातावरणचा होणारा परिणाम खूप महत्वाचा आहे. 

साधनेचे खूप प्रकार आहेत त्यात
१. एकांत साधना
२. समूह साधना
३. गुरुपरिवारासोबत साधना
४. सदगुरूसह केलेली साधना
५. विशिष्ट कार्यप्राप्ती साठी केलेली साधना इ.

तांत्रिक लोक हे गुप्त ठिकाणी साधना करतात कारण त्या ठराविक स्थानी त्यांना ती स्पंदने मिळाली असतात व साधना कित्येक पटीत फलदायी होते. 
पण या सर्वात सद्गुरू मार्गदर्शन खाली निवडलेल साधना स्थान हे सर्वोत्तम असते. त्यांच्या सांगण्यावरून केलेली साधना ही कुठेही फलदायी असतेच. त्या साधना दैवतला आपल्या साधना स्थळी यावच लागत.  कारण गुरुस्पंदने ही सर्वोच्च स्पंदने आहेत (हीच शिवशक्ती स्पंदने आहेत).. ती जेव्हा साधनेत मिसळतात तेव्हा साधना दैवतच काय तर संपूर्ण विश्वातील शक्ती त्वरित तेथे येते. 
त्यामुळे सद्गुरू सांगतील तेथे निःशंक मनाने व निडरतेने साधना करावी. 
याऊलट तुम्हाला लाख सिद्धी प्राप्त झाली आणि सद्गुरूंनी एखाद्या ठिकाणी साधना करू नये असं सांगितलं तर तेथे साधना करू नये कारण भले साधना दैवतच काय तर मूळ शक्ती जरी तिथे समोर जरी आली तरी ती साधना फलद्रूप होत नाही..

 
आदेश🙏🏻

1 comment:

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...