Tuesday 27 April 2021

संयम


कोणतीही गोष्ट असो, संयम महत्वाचा. आपली सेवा ही संयम वर आधारित असते. याच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात.. अध्यात्मिक क्षेत्रात सर्वात जास्त घेतली जाणारी परीक्षा म्हणजे संयमाची असते. 

आपल्याला साधना सुरू केल्याकेल्या अनुभव यावेत आणि साधना सफल होऊन कार्यप्राप्ती व्हावी असे मनापासून वाटते पण ही अशक्य अशी गोष्ट आहे. बीज पेरल्यावर ते उगवायला वेळ लागतो त्याची योग्य काळजी घ्यावी लागते मग त्याचे फळ मिळते पण फळ मिळेपर्यंत ठेवावा लागतो तो संयम आणि विश्वास. साधनरुपी बीजाचे फळ मिळेपर्यंत आपण त्याचे नियमपालन करून काळजी घ्यावी मग मिळालेल्या सफलतेचा आनंद घ्यावा. जरी आपल्याला यश लवकर मिळाले तरी सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय साधना थांबवू नये. 

संयम साधकाला परिपूर्ण बनवतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळणे व ती मिळून पण साधना पूर्ण करणे म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत असा आहे. *सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात कधीकधी नशीब आपल्यासाठी अजून चांगलं काहीतरी लिहीत असते फक्त ते येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा.*
त्यामुळेच एखादी गोष्ट प्रयत्न करून नाही मिळाली म्हणजे आपले प्रयत्न वाया गेलेत अस न समजता ती मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे व संयम बाळगणे गरजेचे असते. आपण इथे आहोत याचा अर्थ आपल्या हातून काही महत्त्वाचे विधिलिखित घडणार आहे मग ती गोष्ट लहान असो की मोठी पण घडणार असतेच. पण त्याचा आपण त्रास करून न घेता  आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करावे. जे होईल ते होईल व जेव्हा होईल तेव्हा होईल. पण याचा अर्थ आळस करणे असा नाही तर प्रयत्न करणे असा घ्यावा. 
साधना दैवत प्रसन्न झाल्याचे संकेत मिळताच सद्गुरुंशी चर्चा करावी व आहे तशी ती सुरू ठेवावी. संयम हा कृतीतून दिसतो. भल्याभल्या अशक्यप्राय गोष्टी केवळ संयम ठेवल्याने साध्य होतात. त्याला प्रामाणिक प्रयत्नांची व विश्वासाची जोड हवी..
परिपूर्ण व परिपक्व साधक होण्यासाठी संयमची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीजवळ  संयम समाधान व सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते...!

प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी

9 comments:

  1. अप्रतिम विवेचन नंदेश नाथ जी

    ReplyDelete
  2. Sayaam matalab ek yudh swayam sr

    ReplyDelete
  3. अप्रतिम
    आत्म चिंतन करायला लावनारा व सुयोग्य मार्गावर नेणार मार्गदर्शन

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...